Friday, April 17, 2026
Homeचंद्रपूर“उगवत्या नेतृत्वाची माघार… पण शहरासमोर उरलेला कडक प्रश्न!” हनुमान घोटेकर यांचे...

“उगवत्या नेतृत्वाची माघार… पण शहरासमोर उरलेला कडक प्रश्न!” हनुमान घोटेकर यांचे प्रसारमाध्यमातून आवाहन..!

भद्रावती:-(प्रतीनीधी):-भद्रावतीच्या राजकारणात गेल्या काही दिवसांत एक बातमी प्रचंड चर्चेत राहिली,
हनुमान घोटेकरांनी नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवणार पण आता माघारी घेतली.
मात्र ही माघार ही भीतीची किंवा कमकुवतपणाची नव्हती…
तर ती होती मायबाप मतदारांना एक तिखट आणि थेट संदेश देण्याची रणनीती.
घोटेकर यांनी प्रसारमाध्यमातून केलेली स्पष्ट भूमिका ही आजच्या घडीला स्थानिक राजकारणात दुर्मीळ बनली आहे.
जेव्हा बहुतेक नेते मऊ शब्दात, कच्च्या स्टेटमेंट्समध्ये गोष्टी टाळतात, तेव्हा त्यांनी
ठेकेदारी राजकारण, सांठगाठ, भ्रष्टाचार आणि नगरपालिकेतील अनियंत्रित गोंधळावर प्रहार केला.
त्यांचा संदेश स्पष्ट होता
“शहर उद्ध्वस्त करणाऱ्या ठेकेदार-उमेदवारांना मतांनी बसवा त्यांच्या जागेवर.”
आणि इथेच हा मुद्दा गंभीर बनतो.
नागरिकांनी विचार करण्याची वेळ आली आहे

भद्रावतीतील अर्ध्याहून अधिक समस्या एका गोष्टीवर नाहीत आहेत.

ठेकेदारी राजकारणाने वेढलेली नगरपरिषद.
रस्ते वारंवार उखडणे..!
दर्जाहीन कामे. ..!

कागदोपत्री प्रकल्प आणि प्रत्यक्षात शून्य कामगिरी..!
ठरावांमध्ये संशयास्पद गती..?
“कोणाचा प्रकल्प कोणाला दिला” या राजकारणावर शहर चालणे
या गोष्टी मतदारांच्या डोळ्यांसमोर घडत राहिल्या… पण जबाबदार ठरविणारा कोणी नव्हता.
अशात एका तरुण नेतृत्वाने माघारी घेत प्रश्न विचारला आहे
“भ्रष्टाचाराला शह देणार की पुन्हा त्याच वाटेने शहर ढासळू देणार?”
ही निवडणूक केवळ व्यक्तींची नाही… तर मूल्यांची लढाई
हनुमान घोटेकरांच्या निर्णयाने राजकीय समीकरणे बिघडली असतील,
पण शहरासाठी एक गंभीर आरसा मात्र उभा राहिला आहे.

  1. आज मतदारांना ठरवायचे आहे
    शहराचे भविष्य पाहून मतदान करणार
    की
    लाभाच्या फेऱ्यात पुन्हा त्याच मंडळींना परत आणणार?
    प्रसारमाध्यमातून दिलेला संदेश महत्त्वाचा..!
    घोटेकर म्हणाले ही माहीती केवळ राजकीय नव्हती,
    तर नागरिकांकडून आंदोलनाच्या सुरुवातीचे बीज होते.
    त्यांचे तीन मुद्दे अत्यंत महत्त्वाचे,
    सुशिक्षित आणि पारदर्शक नेतृत्वाची निवड करा.
    ठेकेदार-नेत्यांची सांठगाठ नाकारावी.
    शहराच्या भविष्यासाठी मतदान करावे, व्यक्ती किंवा पैशासाठी नव्हे.

हे संदेश प्रत्यक्षात प्रसारमाध्यमांतून लोकांसमोर घोटेकर यांनी दिले..
आणि आता त्याची जबाबदारी नागरिकांच्या अंगावर आहे.
शेवटचा प्रश्न विचार..!
शहराला उभारी देण्यासाठी आपली भूमिका काय?
नेते जातील, उमेदवार बदलतील, समीकरणे हलतील…
पण शहराच्या भविष्याचा निर्णय मतदारांच्या बोटांवर आहे.
या निवडणुकीनंतर शहर कुठे जाणार?
भ्रष्टाचारी व्यवस्था मजबूत होणार की नवे नेतृत्व उभे राहणार?
हा प्रश्न आज भद्रावतीने स्वतःला विचारायलाच हवा असे पण प्रसारमाध्यमातून हनुमान घोटेकर यांनी यावेळी सांगीतले..!
“स्वतःसाठी नव्हे… शहराच्या भविष्यासाठी मतदान करा.”
हा संदेश आता फक्त घोटेकरांचा उरलेला नसून,
भद्रावतीच्या प्रत्येक जागरूक नागरिकाचा घोषवाक्य व्हायला हवा.
हनुमान घोटेकर यांचे रोखठोक आवाहन..!

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!