Friday, April 17, 2026
Homeचंद्रपूरमतदान संपलं; मनांशी बांधलेलं नातं तुटलं नाही..! सोनल देवतळे....

मतदान संपलं; मनांशी बांधलेलं नातं तुटलं नाही..! सोनल देवतळे….

 

चंद्रपूर, न्यूज डेस्क ✍️

चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नसले, तरी नागरिकांच्या मनांशी बांधलेले नाते अधिक दृढ झाल्याची भावना सौ. सोनल प्रकाश देवतळे यांनी व्यक्त केली आहे. निवडणूक हा लोकशाहीचा अविभाज्य भाग असून, मिळालेल्या कौलाचा सन्मान राखणे हे प्रत्येक उमेदवाराचे कर्तव्य असल्याचे त्यांनी नमूद केले.

निवडणूक प्रचाराच्या काळात प्रत्येक घरातून मिळालेली आपुलकी, नागरिकांनी दिलेला विश्वास आणि मनापासून व्यक्त केलेली साथ ही आयुष्यभर प्रेरणा देणारी ठरेल, असे त्यांनी सांगितले. “मतांचा निकाल आपल्या बाजूने लागला नाही, याची खंत आहे; मात्र लोकांनी दाखवलेली माया आणि विश्वास यामुळे पुढील वाटचालीस नवे बळ मिळाले आहे,” असे त्यांनी भावनिक शब्दांत सांगितले.

सत्ता मिळो अथवा न मिळो, समाजाशी जोडलेले नाते कधीच संपत नाही, असे सांगत सौ. देवतळे यांनी पुढील काळातही सामाजिक कार्य, महिलांचे सक्षमीकरण, शिक्षण तसेच प्रभागातील विकासकामांसाठी सातत्याने कार्यरत राहण्याचा निर्धार व्यक्त केला. लोकांच्या सुख-दुःखात सहभागी होणे हीच खरी सार्वजनिक सेवा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच निवडून आलेल्या प्रतिनिधींना शुभेच्छा देत, प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक सहकार्य करण्याची तयारी त्यांनी दर्शविली. “हा परिसर माझ्यासाठी केवळ प्रभाग नसून कुटुंबासारखा आहे, आणि या कुटुंबाशी बांधलेले नाते कधीही तुटणार नाही,” असे सांगून त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!