Saturday, June 6, 2026
Homeभद्रावतीआमदार करण देवतळे यांच्या प्रयत्नांना यश; नंदोरी (बु.) येथील इंदिरानगरला जोडणाऱ्या बंधाऱ्यांच्या...

आमदार करण देवतळे यांच्या प्रयत्नांना यश; नंदोरी (बु.) येथील इंदिरानगरला जोडणाऱ्या बंधाऱ्यांच्या कामास १.९७ कोटी रु. मंजुरी..!

भद्रावती:- तालुक्यातील मौजा नंदोरी (बु.) येथील शिर नदी च्या पलीकडे वसलेल्या इंदिरानगर वार्डातील नागरिकांना गेल्या दहा वर्षांपासून मोठ्या प्रमाणात प्रवासाच्या अडचणींचा सामना करावा लागत होता. नदी ओलांडून नंदोरी किंवा तालुक्याच्या इतर भागात ये-जा करताना सतत पाण्यामुळे होणाऱ्या धोक्यामुळे स्थानिकांनी विविध आंदोलने केली, तर काहीवेळा मतदानावर बहिष्कार ही टाकला.
न. या दीर्घकालीन समस्येला आता पूर्णविराम लाभला असून, आमदार करण देवतळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे बंधाऱ्याच्या कामासाठी १.९७ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
भद्रावती तालुक्यातील ही शिर नदी वर्षभर पाणी असलेली असल्याने इंदिरानगरातील शेकडो कुटुंबांना रोजच्या कामकाजात मोठी अडचण भोगावी लागत होती. पूर्वी चांदा ते बांदा योजना अंतर्गत या नदीवर बंधाऱ्याचे काम मंजूर झाले होते. मात्र, निधीच्या अभावी कंत्राटदाराने काम थांबवले आणि प्रकल्प अर्धवट राहिला. या प्रलंबित मुद्द्यावर मागील दहा वर्षांत स्थानिक नागरिकांनी अनेकदा आंदोलने केली. यश मिळत नसल्याने त्यांनी वरोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार करण देवतळे यांना निवेदन देऊन निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली.
आमदार देवतळे यांनी या मागणीला गंभीरतेने घेतली. त्यांनी नंदोरी (बु.) आणि इंदिरानगर येथे प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्
यानंतर जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून पत्रव्यवहार केला आणि जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत काम मंजूर करण्याची शिफारस केली. या प्रयत्नांना यश लाभले असून, आता सदर कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. १.९७ कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊन मृदु व जलसंधारण विभाग मार्फत बांधकाम सुरू होणार आहे. या बंधाऱ्यामुळे इंदिरानगर आणि नंदोरी यांच्यातील कनेक्टिव्हिटी सुधारेल, प्रवास सुरक्षित होईल आणि स्थानिक विकासाला गती मिळेल.
निधी मंजुरीची बातमी कळताच नंदोरी (बु.) आणि इंदिरानगर येथील नागरिकांनी एकत्र येऊन आमदार करण देवतळे यांचे मनःपूर्वक आभार मानले. “देवतळे यांच्या प्रयत्नांमुळे आमच्या दहा वर्षांच्या संघर्षाला पूर्णविराम मिळाला. हा बंधारा आमच्या भागाचा विकासाचा नवीन अध्याय असेल,” असे स्थानिक नागरिकांनी सांगितले. हे काम पूर्ण झाल्यावर शेतकऱ्यांना पाणीटंचाईतून मुक्ती मिळेल आणि जलसंधारणाला चालना मिळेल, अशी अपेक्षा आहे.
करण देवतळे हे महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाचे तरुण आमदार म्हणून ओळखले जाणारे नेते आहेत. त्यांच्या पूर्वीच्या प्रयत्नांमुळे वरोरा मतदारसंघात अनेक विकासकामांना गती मिळाली आहे. या बंधाऱ्याच्या मंजुरीने भद्रावती तालुक्यातील ग्रामीण भागातील विकासकामाना नवीन दिशा मिळाली आहे.

Previous article
नामांकनाच्या अंतिम दिवशीही हाय-ड्रामा..! निवडणूक समीकरणे बदलणार? चंद्रपूर न्यूज डेस्क ✍️ चंद्रपूर : महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकी २०२५-२६ साठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस मंगळवारी (३० डिसेंबर २०२५) असा होता, जेव्हा शहरात विविध राजकीय पक्षांच्या इच्छुक उमेदवारांची प्रचंड गर्दी उसळली. अर्ज भरण्याच्या प्रक्रियेदरम्यान राजकीय गोंधळ, तीव्र नाराजी आणि तणावपूर्ण वातावरण पसरले, ज्यामुळे चंद्रपूर मनपा निवडणूक च्या रिंगणात अचानक रोमांचक वळण आले आहे. नामनिर्देशन प्रक्रिया २३ डिसेंबर २०२५ पासून सुरू झाली होती आणि ३० डिसेंबर हा अंतिम मुदतदिन होता. या दिवशी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत पाच निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमध्ये एकूण ५६५ नामनिर्देशन पत्रे दाखल झाली. प्रभागनिहाय विभाग पाहता, पहिल्या कार्यालयात (प्रभाग १,२,५) ९९ अर्ज, दुसऱ्या कार्यालयात (प्रभाग ३,४,६) ९२ अर्ज, तर तिसऱ्या कार्यालयात (प्रभाग ७,८,९) ८२ अर्ज नोंदवले गेले. ही संख्या चंद्रपूर महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या ६६ जागांसाठीच्या स्पर्धेची तीव्रता दर्शवते. या प्रक्रियेनंतर नामनिर्देशन पत्रांची छाननी ३१ डिसेंबरपासून सकाळी ११ वाजता सुरू होईल, तर उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिवस २ जानेवारी २०२६ पर्यंत आहे. त्यानंतर ३ जानेवारीला उमेदवारांची अंतिम यादी आणि चिन्हे जाहीर होतील. मतदानाची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही, परंतु ही संपूर्ण प्रक्रिया राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकांच्या कार्यक्रमाशी सुसंगत आहे. पक्षांतर्गत गटबाजी आणि बंडखोरीची धास्ती..! शेवटच्या दिवशी पक्षांतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले. अनेक प्रभागांत एकापेक्षा अधिक इच्छुक उमेदवार असल्याने गटबाजी उफाळली. काहींना अधिकृत ए व बी फॉर्म वेळेवर न मिळाल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली गेली. भाजप, काँग्रेस सह इतर पक्षांतून अशीच चढाओढ आणि तणाव दिसून आला. विशेषतः भाजपमध्ये सुधीर मुंगंटीवारांच्या नेतृत्वाखालील अंतर्गत स्पर्धा आणि गटबाजीची चर्चा आहे, ज्यामुळे काँग्रेसला फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उमेदवारी न मिळालेल्या इच्छुकांमध्ये.. बंडखोरीच्या चर्चा रंगल्या असून, काहींनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल करण्याची तयारी दर्शवली. भाजपने ६६ उमेदवारांची यादी जाहीर केली असली, तरी काँग्रेससह इतर पक्षांतही अशीच खलबत सुरू आहेत. अर्ज स्वीकार केंद्रांवर शेवटच्या तासांत प्रचंड धावपळ सुरू होती. वेळा आणि प्रक्रियेवरून काही ठिकाणी वाद झाले, ज्यामुळे शहरातील राजकीय हालचालींना वेग आला. हे सर्व हाय-ड्रामा भाजप-शिवसेना युती, राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर आणि काँग्रेस-जनविकास सेना आघाडी यांसारख्या समीकरणांच्या पार्श्वभूमीवर घडले. चंद्रपूर हे विजय वडेट्टीवारांचे कर्मभूमी असल्याने काँग्रेसची मजबुती दिसते, तर भाजपकडून मुंगंटीवारांच्या नेतृत्वाची मोठी अपेक्षा आहे. २०१७ च्या निवडणुकीत भाजपला ३६, काँग्रेसला १२ जागा मिळाल्या होत्या, ज्यात बसपने ८ जागा जिंकल्या होत्या. यंदा अपक्ष आणि बंडखोरांमुळे समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. या घटनांनी आगामी मतदानाला प्रभावित करणारी स्थिती निर्माण केली आहे. मतदारयादी प्रारूपावर हरकती घेतल्यानंतर अंतिम यादी तयार झाली असून, हे सर्व चंद्रपूर मनपा निवडणूक २०२५ च्या यशस्वी रंगमंचासाठी तयारीचे भाग आहेत. एकंदरीत, शेवटच्या दिवशी दिसलेली अस्वस्थता निवडणुकीचे स्वरूप ठरवणारी ठरेल, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. चंद्रपूरातील हे राजकीय रंगमंच आता छाननी आणि माघारी प्रक्रियेकडे वळले आहे, ज्यात आणखी काही आश्चर्यकारक घडामोडी घडू शकतात.
Next article
spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!