Friday, April 17, 2026
Homeचंद्रपूरमोबाईल हरवला तरी आशा कायम; पोलिसांनी दिला दिलासा..!

मोबाईल हरवला तरी आशा कायम; पोलिसांनी दिला दिलासा..!

भद्रावती:-प्रतिनिधी

नागरिकांचा हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल पुन्हा मिळू शकतो, याचा दिलासादायक अनुभव भद्रावतीतील नागरिकांना आला आहे. भद्रावती पोलीस स्टेशन यांच्या विशेष मोहिमेत एकूण ०५ हरविलेले मोबाईल फोन शोधून काढत ते मूळ तक्रारदारांच्या स्वाधीन करण्यात आले. या मोबाईलची अंदाजित किंमत सुमारे ७० हजार रुपये आहे.
पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी व सहायक पोलीस निरीक्षक वीरेंद्र केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली नापोअं भारत पुसांडे यांनी तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई केली. नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींचा सातत्याने पाठपुरावा करत विविध ठिकाणांहून मोबाईल हस्तगत करण्यात आले, अशी माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे.
तसेच १२ जानेवारी२०२६ रोजी आयोजित कार्यक्रमात हस्तगत केलेले सर्व मोबाईल त्यांच्या मूळ मालकांच्या स्वाधीन करण्यात आले. मोबाईल परत मिळाल्याने तक्रारदार नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद व समाधान दिसून आले. यावेळी पोलिसांनी मोबाईलची योग्य काळजी घेण्याचे तसेच मोबाईल हरविल्यास किंवा चोरीला गेल्यास त्वरित पोलिसांकडे तक्रार नोंदवण्याचे आवाहन केले.
याशिवाय नागरिकांच्या समस्यांकडे गांभीर्याने पाहत, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून केलेली ही सकारात्मक कारवाई पोलिस, नागरिक नातेसंबंध अधिक दृढ करणारी ठरत असून, भद्रावती पोलिसांच्या या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!