Friday, April 17, 2026
Homeचंद्रपूरनिवडून आले तेव्हापासून चेहरा नाही, आता मत कशावरून मागता? माजी नगरसेवकांवर जनतेचा...

निवडून आले तेव्हापासून चेहरा नाही, आता मत कशावरून मागता? माजी नगरसेवकांवर जनतेचा संताप! निवडणूक आली की, लगेच हालचाल सुरू नागरिकांचा सवाल, “आता तरी विकासाचा हिशोब द्या!”

  1. भद्रावती- वरोरा (प्रतिनिधी):-
    शहरात नगरपरिषदेच्या निवडणुकीचे माजी नगरसेवक निष्क्रियांचे तोंड वाजू लागले आहेत.
    राजकीय वातावरण तापत असतानाच माजी नगरसेवक पुन्हा मैदानात उतरण्याची हालचाल सुरू झाली आहे.
    मात्र नागरिकांकडून आता तीव्र नाराजी आणि थेट प्रश्नांचा पाऊस पडतोय..!
    “पाच वर्षांत चेहरा नाही, समस्या सोडविल्या नाहीत, आता मत मागायला कशावरून आलात?”
    भद्रावतीतील अनेक वॉर्डांत गेल्या पाच वर्षांत ठोस विकासकामे झाली नाहीत.
    गावठाणात पाण्याचा प्रश्न, रस्त्यांची दुरवस्था, अंधारे वॉर्ड, नाल्यांची दुर्दशा
    सर्वत्र नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या, पण कोणीही कानाडोळा केला नाही.
    माजी नगरसेवक केवळ निवडणुकीच्या काळातच जनतेकडे येतात,
    बाकीच्या काळात त्यांच्या दर्शनालाही नागरिक मुकले आहेत.
    शहरातील नागरिक आता स्पष्टपणे सांगतात
    “आम्हाला आता चेहऱ्यांवर नव्हे, कामावर विश्वास आहे!
    पाच वर्षे जनता विसरणारे आणि निवडणूक आली की अचानक कार्यकर्ते बनणारे आम्हाला नकोत.”
    वॉर्डातील युवक, महिला गट आणि नागरिक संघटना आता सज्ज झाले आहेत.
    ते म्हणतात
    “या वेळेस शिक्षित, तरुण आणि जनतेत मिळणारे उमेदवार हवेत.
    जुन्या, निष्क्रिय आणि केवळ प्रचारपुरते सक्रिय नेते हवे नाहीत!”
    भद्रावतीतील राजकीय समीकरणे यामुळे बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
    नव्या चेहऱ्यांबाबत उत्सुकता वाढली असून मतदारांमध्ये जागरूकतेची नवी लाट उसळली आहे.
    जनतेचा सूर एकच
    “विकास हवे, दिखावा नको!”
spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!